इस्रायलने मान्य केली भारताची ‘ती’ गोष्ट

जेरुसलेम-
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, भारताने इस्रायलवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून त्याला दहशतवाद असेही म्हटले आहे. आता दहशतवादाविरोधात भारताच्या निर्धाराला पाठिंबा देत इस्रायलने पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केली आहे. भारतातील इस्रायल दूतावासाने मंगळवारी ही माहिती दिली.

इस्रायली दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भारत सरकारकडून इस्रायलकडे कोणतेही आवाहन करण्यात आले नव्हते, तरीही देशानेच हे पाऊल उचलले आहे. इस्रायली दूतावासाने सांगितले की, सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण झाली असून, लष्कर-ए-तैयबा आता इस्रायलच्या बेकायदेशीर दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top