सिंचनासाठी लागणारे ट्रांसफार्मर तात्काळ जोडा– खा.भावना गवळी

यवतमाळ –अतिवृष्टीमुळे खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला असून ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी रब्बीचे पीक शेतकरी घेण्याच्या तयारीत असून त्यांना सिंचनासाठी लागणारी वीज उपलब्ध व्हावी यासाठी वीज वितरण कंपनीने शक्यतो ग्रामीण भागातील वीज व्यवस्था सुरळीत करावी आणि ज्या ठिकाणी ट्रांसफार्मर ची गरज आहे. अशा ठिकाणी ट्रांसफार्मर लावावे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळ काढू धोरण वापरू नये असा सज्जड दम खासदार भावनाताई गवळी यांनी या वेळी दिला आहे. दरम्यान आज वीज वितरण कार्यालय अधिकाऱ्यांसोबत तब्बल दोन तास बैठक घेऊन अनेक विषय मार्गी लावण्या संदर्भात निर्देश दिले.
यवतमाळ जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती गेल्या हंगामामध्ये अतिशय वाईट होती. खरिपाचे पीक गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक कोणतेही निर्णय घेता येत नाही. अशा परिस्थितीत रब्बीची आशा शेतकऱ्यांना आहे. यातून जे काही निघेल ते निघेल व त्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सुरळीतपणे त्यांना वीज पुरवठा झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला तसेच छोटे-मोठे प्रश्न तात्काळ निकाली काढा यासाठी प्रत्येक वेळीच नेत्यांच्या फोनची गरज नको किंवा वीज वितरण कंपनीचा ग्राहक हा प्रत्येक वेळी नेत्यांकडे जायला नको हे देखील त्यांनी सांगितले यावर वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी शक्य तेवढी वीज उपलब्धते नुसार देण्याबाबत आश्वस्त यावेळी आधिकरी यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top