बजाज चौकातील उड्डाण पुलाचे गर्डचे काम शनिवारी

शनिवारी पहाटे तीन तासाचा मेगाब्लॉक   

वर्धा/रवींद्र लाखे-
बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या बांधकामाला जवळपास आज ८ वर्षां पुर्ण झाले. या पुलाचे काम आज अंतिम टप्प्यात असल्याने शनिवारच्या मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुलाचे गर्डर लॉन्चिंगचे काम करण्यात येणार आहेत.यासाठी तीन तासाचा मेगाब्लॉक ची परवानगी रेल्वे विभागाने दिली आहे. मागील आठवड्यात या उड्डाण पुलाची रंगीन तालीम यशस्वी करण्याकरिता एक तास वाहतूक बंद करण्यात आली होती. ती पूर्णपणे यशस्वी झाली होती, त्यानंतर रेल्वे विभागाला मेगा ब्लॉक करिता अनुमती मागितली असता शनिवारी मध्यरात्री तीन तासाचा मेगाब्लॉक करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी `जनमाध्यम’शी बोलताना सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top